15 फेब्रुवारी 2022 सकाळचे बातमी अपडेट....
राज्यात दोन ऐवजी एकच शिवजयंती साजरी करा असे शिवसेना आमदारांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मागणी केली आहे.
मराठा आरक्षणावरुन खासदार संभाजीराजे पुन्हा आक्रमक झाले, त्यांनी येत्या 26 फेब्रुवारीपासून आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे..
हिजाब वरून जे हिंदू मुस्लिम वातावरण तापले आहे, ते चुकीचे आहे खरं तर शाळेत जाताना शाळेचा गणवेश पाहिजेच उद्या कोणीही ही उठून काहीही करेल असे तृप्ती देसाई यांचे विधान दिले आहे..
वाईन विरोधात आंदोलने सुरूच आहेत.. काल Nashik जिल्हाधिकारी कार्यालयासमोर BJP महिला कार्यकर्त्यांनि वाईन विक्रीविरोधात आंदोलन केले आहे...
औरंगाबाद शहरातील कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी ,सामुहिक रजा घेण्याचा निर्णय घेतल्यामुळे शहरातील घंटा गाडी 16 फेब्रुवारी पर्यंत येणार नाही असे सांगण्यात आले आहे..
Hyundai कंपनीची आयनिक 5 हि नवीन इलेक्ट्रिक कार , काल भारतात सादर करण्यात आली आहे हि कार सिंगल चार्जमध्ये 500 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते...
राज्यात काेरोनाच्या तिसऱ्या लाटेत 13 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली होती.. राज्याच्या आरोग्य विभागा कडून याबाबत माहिती मिळाली आहे...
Comments
Post a Comment